Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्यात वर्धा पोलीस उत्कृष्ट तपासात अव्वल ; सबळ पुरावा नसताना जळीत कांडातील आरोपींना केले गजाआड

1 9 7 0 5 5

किशोर कारंजेकर

वर्धा : – जिल्ह्यातील पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी नुकताच उत्कृष्ट तपास कार्याचा पुरस्कार वर्धा पोलिसांना जाहीर केला आहे.

   गेल्या दहा महिन्यांच्या कामगिरीच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने आर्वी कारंजा परिसरात घडलेले प्रकरण व त्याचा तपास उत्कृष्ट ठरला आहे. कोणताही सबळ पुरावा नसताना येथील महिला जळीत कांडातील आरोपींना शोधून काढण्यात स्थानिक पोलिसांना यश आले होते.

या तपासात बाराशेच्यावर महिलांची तपासणी करण्यात आली होती. सातेफळ येथील जंगलातून अखेर आरोपींना पकडण्यात आले. हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे पाठविण्यात आला. संपूर्ण राज्यातून असे तपास कार्य पुरस्कारासाठी विचारार्थ होते. त्यात वर्धा पोलिसांचा तपास अव्वल ठरला. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी माहे ऑक्टोंबर २०२२ मध्ये पदभार सांभाळल्यानंतर हे सर्वात आव्हानात्मक प्रकरण होते. त्यासाठी वर्धा पोलिसांची रोख दहा हजार रुपये व प्रमाणपत्र स्वरूपातील पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच तळेगांव पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

2/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे